Vivek Sindhu - Latest Marathi News

Breaking

‘जलजीवन’साठी भरीव निधी द्या; खा.बजरंग सोनवणेंनी पाण्यासाठी संसदेचे वेधले लक्ष

Updated: डिसेंबर 15, 2025

By Vivek Sindhu

विविध योजनांना भरीव निधी देण्याबाबत धरला आग्रह

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

विविध योजनांना भरीव निधी देण्याबाबत धरला आग्रह

केज: बीड जल्ह्यिात ‘हर घर जल’ देण्यासाठी जलजीवन मिशन योजना राबवण्यिात येत आहे. परंतु मागील दोन वर्षात या योजनेला निधीच दिला जात नाही.यामुळे योजना मंजूर असूनही गावात पाणी पोहचू शकले नाही. सामान्य नागरिकांना स्वच्छ आणि मुबलक पाणी देण्यासाठी जलजीवन योजना महत्वाची असून यासाठी भरीव निधी द्या, अशी आग्रहाची मागणी खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केली. याच बरोबर त्यांनी विविध योजनांसाठी निधीची मागणी करत संसदेचे लक्ष वेधले.

दल्लिी येथे सुरू असलेल्या लोकसभा अधिवेशनात खा.बजरंग सोनवणे यांनी मुद्देसूद मांडणी करत बीड जल्ह्यिातील प्रश्न मांडले. संसदेत पुढे बोलताना खा.बजरंग सोनवणे म्हणाले, भारत हा कृषी प्रधान देश आहे. असे असले तरी शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार भरीव निधी देत नाही. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविणे आवश्यक आहे. याच बरोबर मराठवाड्यातील धाराशीव-बीड-संभाजीनगर या रेल्वेमार्गासाठी अतिरक्ति निधीची गरज आहे. सन २०१४ मध्ये भाजप सरकार सत्तेत आलेले आहे. तेव्हापासून जुन्नर-चौंडी-आष्टी या नवीन रेल्वेमार्गाला निधी मिळत नाही. हा मार्ग व्हावा, यासाठी निधीची आवश्यकता आहे. याच बरोबर मागील अनेक वर्षांपासून अहल्यिानगर-बीड-परळी रेल्वेमार्गाचे काम सुरू आहे. या कामाला मागील काळात गती मिळू शकली नाही. यामुळे कामाला उशीर झाला. निधी उपलब्ध असताना कामाला गती मिळू शकली नाही. आता काम गतीने सुरू आहे, निधी कमी पडत असल्यास तो तातडीने उपलब्ध करून द्यावा, बीड जल्ह्यिात काही ठिकाणी पोस्ट ऑफिस बंद पडले आहेत, ते पुन्हा सुरू करावेत, शिवाय काही ठिकाणी नवीन कार्यालय देखील सुरू करावेत, तशी नागरिकांची मागणी देखील आहे. आता मोबाईलचा काळ आलेला आहे. परंतु असताना बीड जल्ह्यिात आजही विविध भागात मोबाईलची रेंज पोहचलेली नाही. आम्ही बीड जल्ह्यिात ज्याठिकाणी मोबाईल टॉवरची गरज आहे, अशी यादी केंद्राकडे दिलेली आहे. सदरील ठिकाणी नवीन मोबाईल टॉवर उभारावेत, बीड जल्ह्यिात दळणवळणाचा मोठा प्रश्न आहे. केंद्रीय रस्ते मंत्री नितीन गडकरी हे देशभर रस्त्याचे जाळे नर्मिाण करत आहेत. बीड जल्ह्यिात देखील चार पदरी आणि सहा पदरी महामार्गाची गरज आहे. अनेक महत्वाच्या मार्गाची आम्ही मागणी केलेली असून ती रस्त्याची मागणी मार्गी लावावी, जल्ह्यिात आरोग्य यंत्रणेचा बोजवारा उडत आहे. आरोग्य केंद्रांमध्ये सुविधा मिळत नाहीत. आरोग्य केंद्रांना मोठा निधी देवून आरोग्याच्या बाबतीतील प्रश्न सोडवावेत, बीड जल्हिा हा ऊसतोड मजूरांचा जल्हिा आहे. या जल्ह्यिातून महाराष्ट्र आणि महाराष्ट्राबाहेर देखील मजूर काम करतात. अशावेळी त्यांच्या पाल्यांची शाळा सुटते. त्यांच्या पाल्यांसाठी साखर कारखान्यावर शाळा सुरू करण्यात याव्यात, पंतप्रधान आवास योजनेमधून बीड जल्ह्यिात मोठ्या प्रमाणात घरे मंजूर केलेली आहेत. परंतु सद्यस्थितीत मिळत असलेल्या निधीतून घराचे बांधकाम पुर्ण होत नाही. यामुळे प्रधानमंत्री अवास योजनेसाठी किमान ५ लाख रूपये निधी द्यावा, ५ लाख रूपये निधी दल्यिास गरीबांचे घर पुर्ण होईल. बीड जल्ह्यिात जलजीवन मिशन योजनेतून साडेबाराशेवर योजना मंजूर आहेत. या योजनेतून हर घर जल देण्याचा उद्देश आहे. परंतु दोन-तीन वर्षांपासून निधी दिला जात नसल्याने योजना अपुर्ण आहेत. या योजनेला पैसे दिले तर गावात नळाला पाणी दिसेल. मग्रारोहयोमधून चांगली कामे करता येतात, परंतु त्यालाही निधी द्या, यामुळे मजूरांच्या हाताला काम मिळत नाही. या योजनेसाठी देखील निधी द्यावा आणि अल्पसंख्याक समाजातील वद्यिार्थ्यांसाठी वसतिगृह द्यावे, त्यांच्या लेकरांचे शक्षिण व्हावे, त्यांनीही नोकरी करावी, यासाठी केंद्र सरकारने निधी उपलब्ध करून द्यावा, अशी मागण्या खा.बजरंग सोनवणे यांनी संसदेत केल्या.


Categories

Recent Posts