आष्टी – मान्सूनपूर्व अवकाळीने पावसाने जोरदार हजेरी लावल्याने विक्रीसाठी आलेल्य कां‌द्याचे मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले. यामुळे आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याने शेतातच गळफास घेऊन जीवन संपविल्याची घटना निंबोडी येथे रविवार (दि. १) सायंकाळी घडली. गोविंद रंगनाथ आंधळे (४२) असे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे.