अंबाजोगाई: प्रधानमंत्री आवास घरकुल योजना (ग्रामीण) टप्पा दोन अंतर्गत लाभार्थ्यांचे गावपातळीवर सर्वेक्षण सध्या सुरू असून, केंद्र सरकारने या सर्वेक्षणासाठी ३१ मे ही अंतिम तारीख निश्चित केली आहे. मात्र, ऑनलाइन सर्वेक्षणासाठी वापरल्या जाणाऱ्या अधिकृत पोर्टलचा सर्व्हर सतत डाऊन होत असल्याने अनेक पात्र नागरिकांना आपली नोंदणी व माहिती सादर करता आलेली नाही. तसेच सेल्फ सर्वेक्षण होत नसल्याने अनेक लाभार्थी या योजनेपासून वंचित राहण्याची भीती निर्माण झाली आहे.