अंबाजोगाई – विविध घोटाळ्यांमुळे वादग्रस्त ठरलेल्या अंबाजोगाई येथील स्वामी विवेकानंद शिक्षक सहकारी पतसंस्थेतील आणखी एक मोठा गैरव्यवहार उघडकीस आला आहे. पतसंस्थेत सन 2000 ते 2012 या कालावधीतएकूण 2 कोटी 29 लाख 93 हजार 717 रुपयांचा अपहार व गैरव्यवहार झाल्याचे विशेष लेखापरीक्षक सतीष काकासाहेब पोकळे यांनी केलेल्या चाचणी लेखापरीक्षणातून स्पष्ट झाले आहे. या प्रकरणी एकूण १५ जणांविरुद्ध अंबाजोगाई शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पतसंस्थेचा तत्कालीन अध्यक्ष कुरेशी मुजीब अहेमद अब्दुल रहिम याच्या कार्यकाळातच सर्वाधिक गैरव्यवहार झाल्याचे अहवालात नमूद करण्यात आले आहे.