Breaking
Updated: सप्टेंबर 3, 2025
वरपगाव येथे कँडल मार्च काढून सतीश देशमुख यांना वाहिली श्रद्धांजली
‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा
Join Channelकेज – केज तालुक्यातील वरपगाव येथे मंगळवारी सायंकाळी मराठ सेवक सतीश ज्ञानोबा देशमुख यांना श्रद्धांजली देण्यासाठी गावातून कँडल मार्च काढण्यात आला.
वरपगावच्या सतीश देशमुख यांचा मुंबई आंदोलनात सहभागी होण्यासाठी जात असताना शिवनेरी मुक्कामानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी प्रवासादरम्यान रक्तदाब वाढल्याने मृत्यू झाला होता. त्यानंतर मनोज जरांगे पाटील यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले होते. त्यांनी कुटुंबाप्रती संवेदना व्यक्त करून सतीश देशमुख यांचे बलिदान व्यर्थ जाणार नाही असे म्हटले होते. आम्ही यशस्वी होऊनच परत येऊ असा आत्मविश्वास व निर्धार व्यक्त केला होता. आंदोलन संपल्यानंतर वरपगाव येथे जाऊन सतीश देशमुख यांच्या परिवाराची भेट घेणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. शासनाने सतीश देशमुख सह आंदोलनात बळी गेलेल्या आंदोलकांच्या परिवारातील किमान एका नातेवाईकाला सरकारी नोकरीत सामावून घ्यावे अशी मागणीही शासनाकडे केलेली आहे. मंगळवारी शासनाने मागण्या मान्य करताच वरपगावच्या ग्रामस्थानी सायंकाळी ७ वाजता गावातून भव्य कँडल मार्चचे आयोजन केले. यावेळी ‘भारत माता की जय, जय जिजाऊ जय शिवराय, मनोज दादा तुम आगे बडो, वंदे मातरम्, सतीश देशमुख अमर रहे, अमर रहे! यासारख्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. त्यानंतर गावच्या हनुमान मंदिर परिसरात काही वक्त्यांनी भाषने झाली व राष्ट्रगीताने कार्यक्रम संपला. यावेळी गावातील महिला व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.