अंबाजोगाई (प्रतिनिधी) : सध्या आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूरकडे जाणाऱ्या विविध संत पालख्या मार्गक्रमण करत असून, अंबाजोगाई शहरातील मुख्य पालखी मार्गही याच यात्रेचा भाग आहे. मात्र या मार्गावर पंचायत समिती कार्यालयासमोर व यशवंतराव चव्हाण चौक परिसरात उघड्यावर मांस विक्री करणारी अनेक अतिक्रमित दुकाने थाटण्यात आली आहेत. वारकरी संप्रदाय व भाविकांनी या गोष्टीबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत तात्काळ ही दुकाने हटविण्यात यावीत अशी मागणी केली आहे.