बीड – ऊसतोड कामगारांच्या कल्याणासाठी राज्य सरकार गांभीर्याने विचार करत असून, कामगाराचा मृत्यू झाल्यास त्याच्या कुटुंबीयांना दहा लाख रुपयांची मदत देण्याचा प्रस्ताव सरकारच्या विचाराधीन आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज दिली. बीड येथे आयोजित ऊसतोड कामगारांच्या राज्यस्तरीय मेळाव्यात ते बोलत होते.