परळी : राज्यातील पाच प्रमुख ज्योतिर्लिंगांच्या विकास आराखड्यांना गती देण्यासाठी आता वरिष्ठ सनदी अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेवरून हा निर्णय घेण्यात आला असून, हे अधिकारी आपल्या नियुक्त तीर्थक्षेत्रातील प्रकल्पांची नियमित आढावा बैठक घेऊन अहवाल थेट मुख्यमंत्र्यांकडे सादर करणार आहेत.