Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

किट्टी आडगाव मध्ये वीज बील वसुली मोहीम

रितसर कनेक्शन घ्यावीत अन्यथा कारवाईस सामोरे जावे- मिसाळ

माजलगांव (प्रतिनिधी) :-  तालुक्यातील किट्टी आडगाव येथे महावितरण माजलगांव उपविभागीय अभियंता श्री सुहास मिसाळ साहेब यांनी वीज बील वसुली संदर्भात भेट दिली. कोळशाच्या अपुऱ्या साठ्यामुळे राज्यात विजेचे संकट उभे टाकले आहे. कोळशाचा पुरवठा वाढला नाही तर राज्यात

पुन्हा एकदा लोडशेडिंगचे संकट निर्माण होऊ शकत. आता सण-उत्सवांना सुरुवात झाली आहेत, तसेच ऑक्टोबर महिन्याच्या हीट मध्ये विजेची मागणी वाढते. यातच कोळशाचे संकट उभे ठाकले आहे. 

ग्राहकांकडे कोट्यावधी रुपयांची थकबाकी वाढल्यामुळे आज महावितरण कंपनीकडे कर्जाचा मोठा डोंगर  उभा राहिला आहे.

 आपण वीज बील भरावं व वीज चोरी न करता रितसर कनेक्शन घ्यावीत, वीज चोरी थांबवावी अन्यथा वीज चोरांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. असे आवाहन यावेळी त्यांनी केले यावेळी प्रधान तंत्रज्ञ नारायण आगे व ग्रामस्थांची उपस्थिती होती.

Wednesday 13th of October 2021 09:00 PM

Advertisement

Advertisement