Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

विजेच्या शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू

दुसऱ्या घटनेत विद्यूत तार अंगावर पडल्याने म्हैस दगावली

गेवराई : गेवराई तालुक्यात शनिवारी दोन दुर्दैवी घटना घडल्या. तालुक्यातील ताकडगाव येथील घटनेत शेतात विजेच्या शॉक लागल्याने तरुण शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर काजळा येथील दुसऱ्या घटनेत मेन लाईनची विद्यूत तार अंगावर पडल्याने म्हैस दगावली, यामध्ये दैव बलवत्तर म्हणून शेतकऱ्याचा जीव वाचला.

याबाबत माहिती अशी की, गेवराई तालुक्यातील ताकडगाव येथील तरुण शेतकरी राम भास्कर सटले (वय 29) वर्ष यांनी शेतातील मका मकाच्या पिकाचे रानडुक्कर व इतर वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी मका पिकाच्या कडेने तारीचे कुपन केले होते. त्याला रात्री विजेचा शॉक देऊन ठेवून ते सकाळी मनुष्यहानी होऊ नये म्हणून काढून टाकत होते. परंतु शनिवार रोजी सकाळी राम सटले हे दिलेला विजेचा शॉक काढून टाकण्यास गेले असता त्यांनाच विजेचा शॉक लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. त्यांच्या पश्चात एक मुलगी, पत्नी, आई वडील, दोन लहान भाऊ असा परिवार असून सदरील घटनेने हळहळ व्यक्त होत आहे.

Saturday 25th of September 2021 08:32 PM

Advertisement

Advertisement