Breaking

इराण-इस्रायल युद्धाची बीडच्या कांदा उत्पादक शेतकऱ्यांना झळ

Updated: मार्च 4, 2026

By Vivek Sindhu

दरात मोठी घसरण झाल्याने बळीराजा हवालदिल

‘विवेक सिंधु' WhatsApp Channel जॉईन करा

Join Channel

दरात मोठी घसरण झाल्याने बळीराजा हवालदिल

बीड: जिल्ह्यातील तेलघना येथील शेतकऱ्यांवर सध्या इराण आणि इस्रायल यांच्यात सुरू असलेल्या युद्धाचे गंभीर परिणाम दिसून येत आहेत. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षामुळे कांद्याची निर्यात मोठ्या प्रमाणावर विस्कळीत झाली असून, त्याचा थेट फटका स्थानिक बाजारपेठेतील दरांना बसला आहे. आपल्या शेतातील कांदा विक्रीसाठी हैदराबादला नेणाऱ्या शेतकऱ्यांना तिथे अत्यंत कमी भाव मिळाल्याने आपले अश्रू अनावर झाले. आधीच अवकाळी पावसाने पिकाचे नुकसान केलेले असताना, आता शिल्लक राहिलेल्या मालाला योग्य दर मिळत नसल्याने शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

आखाती देशांतील युद्धामुळे निर्यातीचे मार्ग बंद झाल्याने कांद्याला अपेक्षित दर मिळत नसल्याचे वास्तव समोर आले आहे. दरवर्षी साधारणपणे २५ ते ३० रुपये मिळणारा भाव यंदा पूर्णपणे कोसळला असून, शेतकऱ्यांचा लागवड खर्चही निघणे कठीण झाले आहे. तेलघना गावातील अनेक शेतकऱ्यांची हीच व्यथा असून, अनेकांनी बँक आणि सावकारांकडून घेतलेले कर्ज कसे फेडायचे या विवंचनेत ते आहेत. कांदा शेतातच सडून खराब होत असल्याने उत्पादकांचे प्रचंड आर्थिक नुकसान होत आहे.

या गंभीर परिस्थितीवर मात करण्यासाठी सरकारने कांद्याला किमान ३० रुपये हमीभाव द्यावा, अशी मागणी येथील हवालदिल झालेल्या शेतकऱ्यांनी केली आहे. जर वेळीच सरकारी मदत मिळाली नाही, तर शेतकरी आणि त्यांची कुटुंबे पूर्णपणे उद्ध्वस्त होऊन रस्त्यावर येतील, असा इशाराही त्यांनी दिला आहे. एका बाजूला युद्धाचा जागतिक परिणाम आणि दुसऱ्या बाजूला अस्मानी संकट अशा कात्रीत बीडचा कांदा उत्पादक शेतकरी सापडला असून, आता प्रशासनाकडून ठोस मदतीची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.


Categories

Recent Posts