अंबाजोगाई – दि. २९ मे ते १२ जून २०२५ या कालावधीत केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या पुढाकारातून देशभरातील सर्व कृषी विज्ञान केंद्रांमार्फत ‘विकसित कृषी संकल्प अभियान’ राबविण्यात येणार असून, या अभियानात दीनदयाल शोध संस्थान कृषि विज्ञान केंद्र, अंबाजोगाई जिल्ह्यातील नियोजन व सक्रीय सहभाग घेणार आहे, अशी माहिती वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. वसंत देशमुख यांनी दिली.