Breaking
Updated: July 8, 2025
WhatsApp Group
Join Nowआधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत मातांना साडी चोळीची भेट
अंबाजोगाई – दानामुळे एखाद्याचे आयुष्य उज्वल होते. आधार माणुसकीच्या उपक्रमातून मुलांच्या शिक्षणास मदत होत आहे. यातून मानवता जपली जात असल्याचे प्रतिपादन ज्येष्ठ व्याख्याते इंद्रजित देशमुख यांनी रविवारी (दि.६) येथे केले.
आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत पालकांचे छत्र हलवलेल्या ८०० विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते स्कूलकिट व मातांना साडीचोळीची भेट देण्यात आली. त्याप्रसंगी श्री. देशमुख बोलत होते.
Also Read: बनावट पिस्तुल दाखवून बसचालकास धमकी
बीड जिल्हा पोलिस अधीक्षक नवनीत काँवत, आयआरएस अधिकारी नितिका विलाश, ठाणे येथील विद्यार्थी विकास योजनेचे संचालक अरुण करमरकर, पोलिस उपअधिक्षक अनिल चोरमले, डाॅ. सुनिता बिराजदार, गंगा माऊली शुगरचे उपाध्यक्ष हनुमंतकाका मोरे, केएसबीएल ग्रुपचे संचालक शेख शकील बागवान, अर्थवेल पतसंस्थेचे संस्थापक बालासाहेब माने, उद्योजक सरला मर्लेचा, जाधव कोचिंग क्लासेसच्या संचालक ज्योती जाधव, सहशिक्षक स्नेहा लोमटे, आरोग्य अधिकारी डाॅ. आशा मारवाले (जुने), डाॅ. अश्विनी साबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
Also Read: मजुराचे काठीने फोडले डोके
श्री. देशमुख म्हणाले, मुलांनी मोबाईलपासून दूर राहिले पाहिजे, कारण यातून फायद्यापेक्षा तोटे जास्त आहेत. त्यामुळे या राक्षसाचा बंदोबस्त कसा करायचा ते प्रत्येकाने ठरवले पाहिजे, जी माता (आई) आयुष्यभर आपल्यासाठी स्वप्न बघते, तिची काळजीही आपण घेतली पाहिजे असे आवाहनही त्यांनी केले.
स्पर्धकामुळे उर्जा निर्माण होते – नवनीत काँवत
शिक्षणात पुढे जाण्यासाठी आपले निंदक किंवा स्पर्धक असले पाहिजेत, त्यांच्यामुळे आपल्यात यश प्राप्त करण्याची जिद्द व उर्जा निर्माण होते. असे प्रतिपादन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी विद्यार्थ्यांना उद्देशून केले. त्यांनी निंदकाऐवजी शुभचिंतक हा शब्द वापरला.
सैनिकी शाळेत शिक्षण घेतच वडिलांनी दहावीसाठी दिलेले टार्गेट साध्य करण्याच्या दृष्टीने आपण प्रयत्न केले, आणि ते साध्य केले. पुढे हाच अनुभव प्रत्येक ध्येय साध्य करण्यात उपयोगी पडला. आयआयटी होऊन चांगल्या पॅकेजची नोकरी लागलेली असताना यात आपण देशाच्या उपयोगी पडत नसल्याचे लक्षात आल्याने, ही नोकरी सोडून युपीएससीची परीक्षा दिली. दहावीतील अनुभव लक्षात ठेऊन अभ्यास केला. त्यामुळे यात यश प्राप्त झाले आणि आय ए एस झालो. देशाची सेवा करण्यात यश प्राप्त केल्याचे काँवत यांनी सांगीतले.
यावेळी नितिका विलाश व अरुण करमरकर यांनीही उपस्थित मुलांना व महिलांना मार्गदर्शन केले. आधार माणुसकीच्या उपक्रमांतर्गत शेतकरी आत्महत्याग्रस्त कुटूंब, एचायव्ही बाधीत व कोरोनाग्रस्त कुटूंबातील ८०० विद्यार्थ्यांना वर्षभर पुरेल एवढ्या शैक्षणिक साहित्याची स्कुलकिट देण्यात आली. ही किट मिळाल्यानंतर मुलांच्या चेहऱ्यावरील आनंद व्दिगुणीत झाला होता.
प्रास्ताविक आधार माणुसकीच्या उपक्रमाचे प्रमुख ॲड. संतोष पवार यांनी केले. सूत्रसंचालन शिवानंद गुळवे यांनी केले. पत्रकार प्रशांत बर्दापूरकर यांनी आभार मानले. यावेळी वैद्यकीय, अभियांत्रिकी व इतर शिक्षण घेत असलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व गौरव मान्यवरांच्या हस्ते झाला. सर्व महिलांना साडी चोळीची भेट सन्माने देण्यात आली.