कोल्हापूर : पश्चिम महाराष्ट्रातील नागरिकांना बहुप्रतिक्षित दिलासा देणारा ऐतिहासिक निर्णय आज घेण्यात आला असून, मुंबई उच्च न्यायालयाचे सर्किट बेंच (खंडपीठ) येत्या १८ ऑगस्ट २०२५ पासून कोल्हापुरात कार्यान्वित होणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती यांनी शुक्रवारी (दि. १ ऑगस्ट) अधिकृत अधिसूचनेद्वारे ही घोषणा केली.