Breaking News

  • "विवेक सिंधु न्यूज - Stay Updated".

नाली व रस्ते पुनर्वसनासाठी कन्हेरवाडीचे अंबादास रोडे करणार अमरण उपोषण

परळी : मौजे कन्हेरवाडी येथील रहिवासी ,अंबादास ग्यानाजी रोडे ता. परळी वै यांनी गावातील समस्या विषयी माननीय पंतप्रधान भारत सरकार यांना एक निवेदन पाठविले. त्यामध्ये त्यांनी म्हटले आहे की, कन्हेरवाडी ता. परळी वै, येथील ग्रामपंचयतीची नाली व रस्ते भागवत वैजनाथ रोडे व अमोल नवनाथ रोडे यांनी रस्त्यात मुरुम टाकुन रस्ता बंद केलेला आहे. त्यामुळे सांडपाणी एकत्र साठा होवुन डास मच्छर जमा होत आहेत ज्यामुळे डेंगु सारख्या रोगाची लागण होऊ शकते तसेच सदर घाण पाणी हे हातपंपामध्ये जावुन त्याचे पाणी दुषित होवुन आमच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. ग्राम पंचायत कन्हेरवाडी व आपल्याकडे वेळोवेळी निवेदन दिलेले आहेत. यापुर्वी दि.14/06/2017 ला आत्मदहनाचा इशारा दिला होता.मला लेखी आश्वासन दिली नंतर एक वर्षा नंतर ही कार्य केलेले नाही. म्हणुन दि 14/06/2018 ला आत्मदहनाचा इशारा दिला होता. त्या नंतर वर्षभर काम केले नाही त्यामुळे दि. 14/06/2019 ला आत्मदहनाचा इशारा दिला होता. दि. 14/06/2019 ला संध्याकाळी 9:30 वा. कन्हेरवाडी येथे पोलीस व पी. आय साहेब व पत्रकार येवुन चौकशी करुन चार दिवसात काम करुन देण्यास सांगतोत असे आश्वासन देवुन सुद्धा काम केलेले नाही. सांगीतले की तुम्ही आम्हाला आत्मदहन करणार नाहीत असे लिहुन द्या नाहीतर तुम्हाला शासनाच्या पुर्ण सेवामधुन वगळण्यात येईल. दि. 15/06/2019 ला आत्मदहन करणार नाही †से माझ्याकडुन लिहुन घेतले व चार दिवसात काम करतो असे विश्वासन देवुन सुद्धा काम केलेल नाही. 23/09/20 ला पंचायत समिती परळी येथे आमरण उपोषणास बसणार आहेत

Friday 18th of September 2020 09:17 PM

Advertisement

Advertisement